________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
५७
प्रश्नकर्ता : अशा प्रकारे कोणी भगवंत झाले होते?
दादाश्री : जितकेही भगवंत झाले त्या सर्वांना स्वतःची चूक सापडली, आणि ज्यांनी चूक मिटवली ते सर्व भगवंत झालेत. चूक राहणारच नाही अशा प्रकारे चूक मिटवून टाकतात. सगळ्याच चुका दिसतात. अशी एकही चूक नव्हती की जी त्यांना दिसली नसेल. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म अशा सर्वच चुका दिसतात. आम्हालाही आमच्या पाचपन्नास चुका तर दररोज दिसतात आणि त्या सुद्धा सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुका दिसतात की ज्या लोकांना बिलकुल नुकसानकारक नसतात. हे बोलता-बोलता कुणाचे अवर्णवाद बोलले जाते, ती सुद्धा चूकच म्हटली जाते. ती तर परत स्थूल चूकच म्हटली जाते.
चुका कुणाला दिसतात? तेव्हा म्हणे चूक नसलेले चारित्र्य, त्याच्या श्रद्धेत आहे ! हो, आणि चूक असलेले वर्तन वर्तनात आहे, त्याला चूक दिसते. चूक नसलेले चारित्र्य त्याच्या श्रद्धेत असेल, म्हणजेच चूक नसलेले चारित्र्य संपूर्ण दर्शनमध्ये असेल आणि चूक असलेले वर्तन त्याच्या वर्तनात असेल, त्याला आम्ही मुक्त झाला आहे असे म्हणतो. चूकवाले वर्तन जरी असले पण त्याच्या दर्शनात काय आहे ?
__ सूक्ष्मात सूक्ष्म चूक रहित चारित्र्य कसे असावे? ते आत दर्शनात असले पाहिजे. दर्शनात अगदी सूक्ष्मात सूक्ष्म चूकही नसेल असे दर्शन असले पाहिजे, तरच चूक पाहू शकेल ना?! पाहणारा क्लीयर असेल तरच पाहू शकेल. म्हणूनच आम्ही सांगत असतो ना की ३६० डिग्री वाले जे भगवंत आहेत ते संपूर्ण क्लियर (शुद्ध) आहेत आणि ते आमचे अनक्लियरन्स दाखवतात. हे ज्ञान मिळाल्यानंतर सर्वांना दोन गोष्टी तर असतातच. ज्यांना ज्ञान मिळाले नसेल, त्यांनाही दोन असतात आणि यांनाही दोन असतात. ____ या ज्ञानानंतर आत आणि बाहेर पाहू शकतो. म्हणजे आत चूकरहित चारित्र्य हे असे आहे, असे तो दर्शनमध्ये पाहू शकतो! आणि चूकरहित