________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
असे सांगतो. पण ते सांगितले जाते. समजलं ? अशी निर्बळता सर्वांमध्ये असतेच. परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की 'ही आपली चूक झाली, असे व्हायला नको.
११५
त्याला स्वतःला असे वाटले पाहिजे की, हे चुकीचे आहे. तेव्हाच चुका काढण्याची सवय हळूहळू, डिस्चार्ज होत-होत संपून जाईल. हे सर्व डिस्चार्जच होत आहे.
स्वतःच्या चुकांना स्वतःच रागवतो
एकेक अडचणी येतात ना, तेव्हा अगोदर सहन करण्याची शक्ती येते, त्यानंतर अडचणी येतात. नाही तर मनुष्य तिथल्या तिथे खलास होऊन जाईल. म्हणजे असे सर्व नियम आहेत.
प्रश्नकर्ता : दादा, हे सर्व 'व्यवस्थित शक्ती' करत असते ?
दादाश्री : यालाच म्हणतात 'व्यवस्थित शक्ती.' म्हणूनच असे सर्व संयोग एकत्र येऊन मग ती शक्तीही उत्पन्न होईल, नाही तर या मनुष्याचे काय हाल होतील! तेव्हा आता अजिबात घाबरण्यासारखे नाही. आपल्याला तर हे 'दादा' आहेत आणि 'मी' आहे बस, दुसरे काहीच नाही या जगात. ‘दादा' आहेत आणि ‘मी' आहे, आम्ही दोघेच. दादांसारखी प्रचंड ' खुमारी' असली पाहिजे. कोणी बापही आपला वरिष्ठ नाही, अशी. वरिष्ठाचेही वरिष्ठ म्हटले आहे दादांना !
प्रश्नकर्ता: दादा, पण आम्हाला तर अजून आमच्या चुका घाबरवतात ना ?
दादाश्री : हो, त्या घाबरवतील.
प्रश्नकर्ता : मग तुमच्या स्थितीपर्यंत पोहोचता-पोहोचता तर...
दादाश्री : चुका घाबरवतात ना ! तेही आपल्याला समजते ना, की
हे कोण घाबरवत आहे ? आपण ते जाणतो. पण मुळात तर आपण दादाच