________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७९
दोषांचा धबधबा दिसतो ना! जितके दोष दिसले तितके गेले (संपले). पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढेच दोष उत्पन्न होत राहतील. निरंतर वाहतच राहतील. जोपर्यंत तुम्हाला निर्दोष बनवत नाही तोपर्यंत वाहतच राहतील. पण आता मात्र हलके होता येईल!
__ धबधब्यासारखे दोष दिसतील असे काही करा, त्यात काय जास्त महेनत आहे? तुमचे जे स्वरुप आहे ते स्वरुप आणि चंदुलाल वेगळे. चंदुलालचा खांदा थोपटा! चंदुलाल काही चांगले काम करुन आले असतील त्या दिवशी म्हणावे, 'तुम्ही तर एवढ्या वयात चांगला लाभ करुन घेतला. तुम्ही सुटाल तर आम्हाला सोडाल.' जोपर्यंत तुम्ही चिकटून बसले असाल तोपर्यंत आमची सुटका होणार नाही. म्हणून आपण म्हणावे लवकर काम आटोपून सत्संगातला जा.' 'चंदुभाऊ असे करा, तसे करा,' असे त्यांना प्रोत्साहित करीत राहा. तुम्ही तर वरिष्ठ झालात आणि 'मुलांसाठी एवढी हाय-हाय कशासाठी करता?' असे तुम्ही सांगायला हवे. कोणत्या जन्मात मुले नव्हती? कुत्री, मांजरी, एकही जन्म मुलांशिवाय गेलाच नाही ना? नाहीत ही खरी मुले! ही तर लौकिक वस्तू आहे. हे काय खरे आहे ?
हे सर्व रिलेटिव्ह आहे. ही दुधी ओरडते का, की माझी मुलं किती? शंभर दुधी लागल्या तर शंभरही तुझीच मुले! जशी पाना-पानांना दुधी लागते तसे या लोकांना दिड-दिड वर्षात, दोन-दोन वर्षात एक दुधी लागत राहते!!! दुधीभोपळ्यात सुद्धा जीव आहे आणि यांच्यात सुद्धा जीव आहे. दुधीत एकेन्द्रिय जीव आहे आणि यांच्यात पंचेन्द्रिय जीव आहे, पण जीव तर दोघांमध्येही आहेच ना! जीव तर दोघांमध्ये सारखाच आहे!
म्हणजे स्वत:चे दोष दिसत आहेत ना? चंदुभाऊला सांगायचे सुद्धा की 'चंदुभाऊ, असे कशासाठी करता? आम्ही तुमची सुटका करू इच्छितो, तुमची सुटका होईल तर आमचीही सुटका होईल. चंदुभाऊ शुद्ध होतील तेव्हाच तर आपली सुटका होईल.
म्हणून आपण आत स्वत:लाच सांगायचे की 'चंदुभाऊ, तुमचाच