________________
16
सेवा - परोपकार
'मला समाजसेवा करायची आहे.' मी विचारले, 'तु कोणती समाजसेवा करणार?' तेव्हा तो म्हणाला, 'श्रीमंत लोकांकडून पैसे आणून लोकांमधे वाटतो.' मी विचारले, 'वाटल्यानंतर माहित पडते की ते कसे खर्च होतात ?' तेव्हा तो म्हणतो, 'ते आपल्याला बघण्याची काय गरज आहे ?' नंतर त्याला समजावले की, 'भाऊ, मी तुला मार्ग दाखवितो, त्याप्रमाणे कर. श्रीमंत लोकांकडून पैसे आणतोस त्यातून त्याला शंभर रुपयांची हातगाडी घेऊन दे. ती हातगाडी असते ना, दोन चाकांची. ती शंभर-दीडशे किंवा दोनशेची गाडी घेऊन दे आणि पन्नास रुपये आणखी दे आणि सांग की, 'तू भाज्या घेऊन त्या विकून रोज संध्याकाळी मला मूळ रक्कम परत देत जा. फायदा तुझा आणि हातगाडीचे एवढे पैसे रोजचे मला देत जा.' यावर तो म्हणाला, 'खूप चांगले वाटले, तुम्ही परत सुरतमध्ये याल तोपर्यंत पन्नास-शंभर लोकांना मी एकत्र करेल. ' म्हणजे असे काही करा ना आता, हातगाड्या वगैरे आणून द्या या गरीब लोकानां, त्यांना काय मोठा व्यवसाय करण्याची गरज आहे का ? एक गाडी तेवढी घेऊन द्याल तर संध्याकाळपर्यंत वीस रुपये कमवतील. तुम्हाला कसे वाटते ? त्यांना असे काहीतरी दिले तर आम्ही पक्के जैन आहोत की नाही? असे आहे, की अगरबत्ती सुद्धा जळता जळता सुगंध देत जळते, नाही का ? पूर्ण खोली सुगंधाने भरुन जाते ना? मग काय आपल्यामुळे सुगंध पसरणारच नाही ?
आपण असे का असावे? मी तर वयाच्या पंचवीस- तिसाव्या वर्षी खूप अहंकार करत होतो आणि तो सुद्धा विचित्र प्रकारचा अहंकार करत होतो, एखादी व्यक्ति मला भेटली आणि त्या व्यक्तिला माझ्याकडून काही फायदा झाला नाही तर माझे भेटणे चुकीचे असायचे. म्हणून प्रत्येक व्यक्तिला माझ्याकडून लाभ प्राप्त झाला प्राप्त होता. मी भेटलो आणि त्याचा जर फायदा झाला नाही, तर माझे भेटणे काय कामाचे ? आंब्याचे झाड काय म्हणते की, मला भेटलात आणि आंब्याचे दिवस आहेत आणि जर समोरच्याला लाभ झाला नाही तर मी आंबाच नाही. मग जरी छोटा तर छोटा, तुला योग्य वाटेल तसा, पण तुला त्याचा लाभ तर होणार ना ! ते आंब्याचे झाड स्वतः कोणताही फायदा घेत नाही. असे काही विचार