SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 59
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य पण तरी सुद्धा स्वप्न आले म्हणून त्याला अगदी दूर्लक्ष करण्याचीही गरज नाही, तिथे सावध राहावे. स्वप्नावस्थेनंतर सकाळी त्यासाठी पश्चाताप करावा लागतो, त्याचे प्रतिक्रमणही करावे लागते की पुन्हा असे होऊ नये. आपल्या पाच आज्ञेत राहिले तर त्यात विषय-विकार होईल असे आहेच नाही. 46 तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे असेल तर सर्व प्रकारे सावध राहावे लागेल. वीर्य जेव्हा ऊर्ध्वगामी होते तेव्हा मग आपोआप चालत राहील. अद्याप तर वीर्य ऊर्ध्वगामी झालेले नाही. अजून तर त्याचा अधोगामी स्वभाव आहे. वीर्य ऊर्ध्वगामी होते तेव्हा सर्वच उंची वर चढते. मग तर वाणी - बाणी छान निघते, आत दर्शनही उच्च प्रकारचे विकसित झालेले असते. वीर्य ऊर्ध्वगामी झाल्यानंतर अडचण येत नाही, तोपर्यंत खाण्या-पिण्याचे खूप नियम ठेवावे लागतात. वीर्य ऊर्ध्वगामी होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत तर करावी लागेल ना, की मग असेच चालत राहील ? ब्रह्मचर्य जर असे कित्येक वर्षांपर्यंत कंट्रोलपूर्वक सांभाळता आले तर वीर्य ऊर्ध्वगामी होते आणि तेव्हा मग हे शास्त्र पुस्तके हे सर्व डोक्यात धारण करु शकतो. धारण करणे हे काही सोपे नाही, नाहीतर एकीकडे वाचतो आणि दुसरीकडे विसरत जातो. प्रश्नकर्ता: हे जे प्राणायाम करतात, योग करतात हे ब्रह्मचर्यासाठी मदतरुप होऊ शकते का ? दादाश्री : जर ते ब्रह्मचर्येच्या भावनेने केले असेल तर मदतरुप होऊ शकते. ब्रह्मचर्यासाठी भावना असायला हवी. आणि तुम्ही जर तब्येत चांगली करण्यासाठी करत असाल तर त्याने तब्येत चांगली राहते. अर्थात भावनेवर सर्व काही आधारीत आहे. पण तुम्ही याच्यात्याच्यात पडू नका, नाहीतर तुमचा आत्मा राहून जाईल एकीकडे. घडले तर गोंधळून जातो. एक मुलगा अस्वस्थ दिसत होता, तेव्हा मी विचारले, 4 'काय भाऊ, का अस्वस्थ आहेस ?' तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला सांगताना ब्रह्मचर्य व्रत घेतले असेल आणि त्यात काही उलट - - सुलट
SR No.034043
Book TitleBrahmcharya Sankshipt Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages110
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy