________________
प्रतिक्रमण
पहाण्याचा एवढाच हेतू आहे की आपण शुद्ध अवस्थामध्ये, जागृत अवस्थामध्ये आहोत.
७७
प्रश्नकर्ता : तर मग त्याचा आपल्या प्रति वाईट भाव असेल, तो कमी होईल ना?
दादाश्री : नाही, कमी नाही होणार. तुम्ही प्रतिक्रमण केले तर होईल. शुद्धात्मा पाहिल्याने नाही होणार, परंतु प्रतिक्रमण केले तर होईल.
प्रश्नकर्ता : आपण प्रतिक्रमण केले तर त्या आत्मावर परिणाम होईल की नाही ?
दादाश्री : होईल ना, परिणाम होईल, शुद्धात्मा पाहिल्याने पण फायदा होईल. पण लगेच फायदा नाही होणार, नंतर होईल हळू हळू, हळू ! कारण की शुद्धात्मा दृष्टिने कोणाला पाहिलेच नाही. चांगला माणूस किंवा वाईट माणूस, या दृष्टिने पाहिले आहे. पण शुद्धात्मा दृष्टिने कोणी पाहिले नाही.
जर वाघ बरोबर प्रतिक्रमण केले तर वाघ पण आपल्या सांगितल्या प्रमाणे काम करेल. वाघमध्ये आणि मनुष्यमध्ये फरक काहीच नाही. फरक तुमच्या स्पंदनांचा आहे, ज्यांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. वाघ हिंसक आहे असे तुमच्या ध्यानात आहे, तेथपर्यंत तो स्वत: हिंसकच राहील. आणि वाघ शुद्धात्मा आहे असे ध्यान राहिले, तर तो शुद्धात्माच आहे आणि अहिंसक राहील. सर्व काही संभव आहे.
एकदा आंब्याच्या झाडावर माकड आले आणि कैऱ्या तोडून टाकू लागले, तर परिणाम कुठ पर्यंत बिघडतो की हे झाडच कापून टाकले असते तर बरे. असे (विचार) करून टाकतो. आता भगवंताच्या साक्षीत निघालेली वाणी काय व्यर्थ थोडीच जाणार? परिणाम नाही बिघडला तर काही च नाही. सर्व शांत होऊन जाईल, बंद होऊन जाईल. हे सर्व आपलेच परिणाम आहेत. आपण आजपासून कोणासाठी स्पंदन करण्याचे, कोणासाठी किंचित्मात्र विचार करण्याचे बंद करून द्या. विचार आला तर प्रतिक्रमण करून धुवून टाकायचे. म्हणजे पूर्ण दिवस कोणाच्याही