________________
प्रतिक्रमण
४३
प्रश्नकर्ता : मानसिक संघर्ष आणि जे दोष......
दादाश्री : ते मानसिक नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे हा सूक्ष्मतर संघर्ष आहे त्यावेळी सूक्ष्म संघर्ष पण बरोबरच असणार ना?
दादाश्री : ते आम्ही पाहायचे नाही. सूक्ष्म वेगळे असते. आणि सूक्ष्मतर वेगळे असते. सूक्ष्मतम अर्थात् तर शेवटची गोष्ट.
प्रश्नकर्ता : एकदा सत्संगमध्येच गोष्ट अशा प्रकारे केली होती की, चंदुलाल बरोबर तन्मयाकार होणे ते सूक्ष्मतम संघर्ष म्हणायचे.
दादाश्री : होय, सूक्ष्मतमसंघर्ष ! त्याला टाळायचे. चूकून तन्मयाकार झालात ना. नंतर माहित पडते ना की ही चुक होऊन गेली.
प्रश्नकर्ता : आता केवळ शुद्धात्मा शिवाय या संसारची कोणतीच विनाशी वस्तु मला नाही पाहिजे, तरीसुद्धा या चंदुभाईला तन्मयाकार अवस्था अधून-मधून असते. अर्थात् ते सूक्ष्मतर संघर्ष झाले ना?
दादाश्री : ते तर सूक्ष्मतम म्हणतात.
प्रश्नकर्ता : तर ते संघर्ष टाळायचा उपाय फक्त प्रतिक्रमण एकच आहे की दुसरा काही आहे?
दादाश्री : दुसरे काही हत्यार नाहीच.
प्रश्नकर्ता : पण दादाजी, आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते, ते आमचा अहम् नाही म्हणला जाणार ?
दादाश्री : नाही म्हणजे आम्हाला प्रतिक्रमण नाही करायचे. चंदुभाईचे आहे, शुद्धात्मा तर जाणत आहे, शुद्धात्मानी गुन्हा केला नाही. म्हणून 'त्याला' नाही करावे लागत. फक्त गुन्हा केला असेल 'त्याला'. अर्थात् चंदुभाई प्रतिक्रमण करणार. अतिक्रमणानेच संसार उभा झाला आहे. अतिक्रमण कोण करत असते? अहंकार आणि बुद्धि दोन्ही मिळून
करतात.