________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
होऊन जाईल. त्याची भीती नका ठेऊ. ती आपल्या डोक्यावर केव्हा चढेल? जर तिची मिशी उगवेल तर ती चढून बसेल. पण मिशी उगवणार आहे का? कितीही हुशार झाली, तरी मिशी उगवणार?
बाकी, एक जन्म तर तुमचा जितका हिशोब असेल तितकाच फेडावा लागेल. इतर काही लांबलचक हिशोब होणारच नाही. एका जन्माचा हिशोब तर निश्चितच आहे, तर मग आपल्याला शांतता ठेवायला काय हरकत आहे?
हिंदू तर मुळातच क्लेशी स्वभावचे. म्हणून तर असे म्हणतात की हिंदू क्लेशमय जीवन जगतात. मुसलमान लोक तर असे पक्के असतात की बाहेर भांडण करुन येतात. परंतु घरात बायकोसोबत भांडण करत नाहीत. तसे आता तर मुस्लिम लोकही हिंदुंसोबत राहिल्यामुळे बिघडले आहेत. पण तरीही ह्या बाबतीत हिंदुपेक्षा मुस्लिम लोक मला-शहाणे वाटतात. अरे काहीजण तर आपल्या बीबीला (पत्नीला) हेलकावे सुद्धा देत असतात.
प्रश्नकर्ता : ते हेलकावे देत होते, मिंयाभाई! ती गोष्ट सांगा ना!
दादाश्री : हा, एके दिवशी आम्ही एका मिंयाभाईकडे गेलो होतो. ते मिंयाभाई बायकोला झोपाळ्यावर झुलवत होते. त्यावर मी त्यांना विचारले की, आपण असे करता त्यामुळे ती आपल्या डोक्यावर चढून नाही बसत ? तेव्हा ते म्हणाले, ती काय चढून बसणार, तिच्याजवळ तर काही शस्त्रही नाही. आम्हा हिंदूना तर भीती वाटते की ती चढून बसली तर काय होईल ? त्यामुळे आम्ही झोके देत नाही. तेव्हा मिंयाभाई बोलले की 'हे झोके देण्याचे कारण तुम्हाला माहित आहे का?
तर ते असे झाले की, १९४३-१९४४ मध्ये आम्ही गवर्मेन्ट कामाचे कॉन्ट्रेक्ट घेतले होते, त्यात एक गवंडी कामाचे लेबर कॉन्ट्रेक्ट होते. त्याने आमच्या हाताखाली कॉन्ट्रेक्ट घेतले होते. त्याचे नांव होते अहमदमिंया, हे अहमदमिंया कित्येक दिवसापासून बोलत होते की, 'साहेब माझ्या घरी तुम्ही या, माझ्या झोपडीत या,' झोपडी बोलत होता बिचारा. बोलण्यात चांगले समजूतदार होते, वर्तनात असतील किंवा नसतीलही, ती गोष्ट वेगळी पण बोलण्यात जिथे स्वार्थ नाही, तिथे चांगले वाटते.