________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
१०१
विषयविकारी भाग बंद केला तर आपोआपच सारे काही बंद होऊन जाईल. त्याच्यामुळेच सतत कीट-कीट चालू राहते.
प्रश्नकर्ता : आता ते कसे करावे? ते बंद कसे करावे? दादाश्री : विषयविकार जिंकायचा.
प्रश्नकर्ता : विषयविकार जिंकता येत नाही, म्हणून तर तुम्हाला शरण आलो आहोत..
दादाश्री : किती वर्षापासून विषयविकार.. म्हातारपण आले तरी विषय? जेव्हा पहावे तेव्हा विषयविकार, विषयविकार आणि विषयविकार!
प्रश्नकर्ता : हा विषयविकार बंद केल्यावर सुद्धा क्लेश, नाही टळत म्हणून तर आम्ही तुमच्या चरणी आलो आहोत.
दादाश्री : क्लेश होणारच नाही. जिथे जिथे विषयविकार बंद आहे तिथे, मी पाहिले आहे की जे जे पुरुष मजबूत मनोबळाचे, सामर्थ्यवान आहेत त्यांच्या पत्नी त्यांच्या सांगण्यानुसार चालतात.
तिच्याशी विषयविकार बंद केल्याशिवाय दुसरा काही उपायच सापडला नाही. कारण की ह्या जगात राग-द्वेषाचे मूळ कारणच हे आहे, मौलिक कारणच हे आहे. ह्यातूनच राग-द्वेषाचा जन्म झाला. इथूनच संसार उभे झाले आहेत. म्हणून जर संसार बंद करायचा असेल तर तो इथूनच बंद करावा लागेल.
ज्याला क्लेश करायचा नसेल, जो क्लेशाचा पक्ष घेत नसेल त्याला जर क्लेश होत असेल तर ते हळू हळू कमी होत जाईल. हे तर, क्लेश केलाच पाहिजे असे मानतात तोपर्यंत क्लेश जास्त होतात. क्लेशाचे पक्षदार आपण होता कामा नये. क्लेश करायचाच नाही असा ज्यांचा निश्चय आहे, त्यांचा क्लेश घटतच जातो. आणि जेथे क्लेश आहे तिथे भगवंत उभेच राहणार नाही ना!
डबल बेडची सिस्टम बंद करा आणि सिंगल बेडची सिस्टम ठेवा. हे तर सर्वच बोलतात, 'डबल बेड बनवा, डबल बेड....' पूर्वी हिंदुस्थानात