________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
पण
लक्ष्मीमुळे वैर बांधले जातात, अहंकारामुळे वैर बांधले जातात, हे विषयविकाराचे वैर तर खूप विषारी असते.
९९
विषयातून निर्माण झालेला चारित्रमोह, ते तर ज्ञान वगैरे सर्व उडवून टाकतो. अर्थात् आतापर्यंत विषयविकारामुळेच सर्व अडले आहे. मूळात विषय आहे आणि त्यातून मग लक्ष्मीवर राग (मोह/आसक्ती) बसला आहे, आणि त्याचा अहंकार आहे. अर्थात् मूळ विषय जर निघून गेला, तर सर्व काही निघून जाईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे बी ला भाजता यायला हवे, पण बी ला कसे भाजावे ?
दादाश्री : ते तर आपल्या प्रतिक्रमणने, आलोचना-प्रतिक्रमणप्रत्याख्यानने.
प्रश्नकर्ता : हेच ? दुसरा कुठला उपाय नाही ?
दादाश्री : दुसरा कुठला उपाय नाही. तप केल्याने पुण्य बांधाल आणि बी शेकल्यावर निराकरण होईल. समभावाने निकाल करण्याचा कायदा काय सांगतो की, तू कुठल्याही प्रकारे असे निकाल कर की त्याच्याशी वैर बांधले जाणार नाही. वैरपासून मुक्त होऊन जा.
प्रश्नकर्ता : ह्यात वैर कसे बांधले जाते ? अनंतकाळाचे जे वैर चे बी पडते ते कश्या प्रकारे होत असते ?
दादाश्री : त्याचे असे आहे, की मेलेला पुरुष अथवा मेलेली स्त्री असेल आणि समजा त्यात काही औषध भरले आणि पुरुष पुरुषा सारखाच राहिला आणि स्त्री स्त्री सारखीच राहिली तर काही हरकत नाही, त्यांच्या सोबत वैर बांधले जाणार नाही. कारण ते जिवंत नाहीत. आणि हे तर जिवंत आहेत म्हणून वैर बांधले जातात.
प्रश्नकर्ता : पण ते कश्यामुळे बांधले जातात ?
दादाश्री : अभिप्राय 'डिफरन्स' (भिन्न) आहेत म्हणून. तुम्ही म्हणाल की, 'आता मला सिनेमा पहायला जायचे आहे.' त्यावर ती म्हणेल