________________
९४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
बांगड्या विकल्या जात होत्या! सगळीकडे असेच होत असते का? नाही होत, सर्वत्र असे नाही होत? कित्येक तर सोने दिले तरीही घेत नाहीत. काहीही द्या तरी नाही घेत! पण इतर स्त्रिया तर विकल्या जातात, आजच्या स्त्रिया. सोन्याच्या दराने नाही तर दुसऱ्या दराने विकल्या जातात!
अर्थात् ह्या विषयविकारामुळेच स्त्री झाली आहे. फक्त विषयविकारामुळेच आणि पुरुषांनी स्त्रियांना भोगण्यासाठी एनकरेज (उत्तेजीत) केले आणि बिचारीला बिगडवले. तिच्यात बरकत नसेल तरीही बरकत आहे असे स्वतः मानून घेते. तेव्हा विचारले, तिने असे का मानून घेतले ? कश्या प्रकारे मानले? तर पुरुष तिला तसे सतत सांगत राहिले, त्यामुळे ती समजते की तो जे बोलत आहेत त्यात काय चुकीचे आहे. ती स्वत:हून तसे मानत नाही. पण तुम्ही म्हणालात की, तू खूप चांगली आहेस, तुझ्यासारखी तर दुसरी कोणी असूच शकत नाही. तुम्ही तिला म्हणालात की तू खूप सुंदर आहेस, तेव्हा मग ती स्वतःला सुंदर मानू लागते. ह्या पुरुषांनी स्त्रीला स्त्री रूपातच ठेवले आहे. आणि स्त्री मनात मानते की मी पुरुषाला मूर्ख बनवते. असे करुन पुरुष तिला भोगून मोकळा होतो.
प्रश्नकर्ता : याचा अर्थ असा की, स्त्रिया बऱ्याच जन्मात स्त्री म्हणूनच जन्म घेतील हे काही नक्की नाही. पण हे त्या स्त्रियांना माहित नाही म्हणून त्यावर उपाय होत नाहीत.
दादाश्री : उपाय केले तर स्त्री ही पुरुषच आहे. त्या ग्रंथीला ओळखतच नाही बिचारी आणि तिथे इंटरेस्ट येतो, मजा वाटते म्हणून त्यातच अडकून राहते आणि (हा) रस्ता कोणाला माहितच नाही म्हणून दाखवलाही जात नाही. ते केवळ सती स्त्रियांनाच माहित होते, (लग्नानंतर) लगेचच पती मृत्यु पावला, निघून गेला तरी सती स्त्रिया स्वत:च्या पती शिवाय अन्य कुठल्याही पुरुषाचा कधीही विचार सुद्धा करत नाहीत. त्याच पतीला पती मानतात. तर असे त्या स्त्रियांचे सर्व कपट विरघळून जाते.
सतीत्व असेल तर कपट आपोआपच निघून जाते. तुम्हाला काही बोलावे लागत नाही. ती मूळ सती तर जन्मापासूनच सती असते. म्हणजे