________________
पाप-पुण्य
त्या सर्वांना? खरा संतोष. म्हणून तर त्यांना ते घर आवडते. तसे असेल तरच आवडते. आता त्या आदिवासींना आणून आपल्या इथे चार दिवस ठेवून पहा. त्यांना इथे चैन पडणार नाही, कारण ज्याप्रमाणे त्यांचा बुद्धीचा आशय आहे त्याचप्रमाणे पुण्याचे डिविजन (विभाजन) होते. टेंडरप्रमाणे आइटम मिळते.
३५
प्रश्नकर्ता : जर पुण्य-पापाच्याच आधीन असेल तर टेंडर भरायचे राहिलेच कुठे?
दादाश्री : हे टेंडर भरले जाते ते पाप-पुण्याच्या उदयाप्रमाणेच भरले जाते. म्हणून मी जरी सांगतो की टेंडर भरा, पण मी जाणतो की कशाच्या आधारे ‘टेंडर' भरले जात आहे. या दोन कायद्याच्या बाहेर चालू शकेल असे नाही.
मी पुष्कळ जणांना ‘टेंडर' भरून माझ्याजवळ आणायला सांगतो. पण कोणी भरून आणलेले नाही. कशाप्रकारे भरतील? हे पाप पुण्याच्या आधारावर आहे. अर्थात पापाचा उदय असताना खूप धावपळ करशील तर जे जवळ आहे तेही निघून जाईल म्हणून घरी जाऊन झोप. आणि साधारण थोडे थोडे काम कर, आणि पुण्याचा उदय असेल तर भटकण्याची गरजच कुठे आहे? घरी बसल्या-बसल्या समोरासमोर थोडेसे काम केल्यानेही सर्व प्राप्त होऊन जाईल, म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही स्थितींमध्ये जास्त धावपळ करायला मनाई करतो.
गोष्टीला फक्त समजून घेण्याचीच आवश्यकता आहे.
पुण्याच्या खेळासमोर व्यर्थ प्रयत्न कशाला?
पुण्य फळ देण्यासाठी सन्मुख झाले आहे तर मग कशासाठी व्यर्थ प्रयत्न करतोस? आणि जर पुण्य फळ देण्यास सन्मुख आलेले नाही तर उगाचच ढवळाढवळ कशासाठी करतोस ? सन्मुख आले नाही आणि त्यात तु ढवळाढवळ केलीस तरी काहीही फरक पडणार नाही. आणि सन्मुख आले असेल तर तु कशासाठी ढवळाढवळ करतोस? जेव्हा पुण्य फळ देण्यास तयार होईल तेव्हा वेळ लागणार नाही.