________________
पाप-पुण्य
पंचवीस वर्षाचा असताना जर आई मरून गेली तर? अर्थात तो जाणतेपणीने दुःख भोगतो आणि दुसरा अजाणतेपणी दुःख भोगतो.
चुक शेठची की आपल्या पापांची? शेठ बक्षीस देत असतील, ते आपले 'व्यवस्थित' आहे आणि आपले 'व्यवस्थित' जेव्हा वाईट येते तेव्हा शेठच्या मनात येते की, या वेळी ह्याचा पगार कापायला हवा. म्हणून शेठ पगार कापून घेतो. तेव्हा नोकराच्या मनात येते की हा शेठ नालायक आहे. हा नालायक मला भेटला. परंतु असा गुणाकार करणाऱ्या मनुष्याला माहित नाही की जर हा नालायक असता तर मला बक्षीस कशासाठी देत होता? म्हणजे यात काहीतरी चुक होत आहे. शेठ चुकीचे नाहीत. हे तर आपले 'व्यवस्थित' बदलत आहे.
हे सर्व पुण्य चालवित असते. तुला हजार रुपये पगार कोण देतो? पगार देणारा तुझा शेठ सुद्धा पुण्याच्या आधीन आहे. पाप जेव्हा घेरतात तेव्हा कर्मचारी शेठला सुद्धा मारतात.
जागृती, पुण्य आणि पापाच्या उदयात... प्रश्नकर्ता : लोकांची पुण्याई असेल म्हणून त्यांना ही संपत्ती प्राप्त झाली.
दादाश्री : ही सर्व पुण्याई आहे ना, जबरदस्त पुण्याई, पण संपत्ती सांभाळणे खूप कठीण होते.
प्रश्नकर्ता : हो. हे खरे आहे. यात उपाधी तर आहेच ना? सुरुवात मग तिथूनच होते.
दादाश्री : संपत्ती नसेल त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही.
प्रश्नकर्ता : पैसे नसतील, संपत्ती नसेल तर त्याच्यासारखे काहीच नाही?
दादाश्री : हो, त्या सारखे काहीच नाही. संपत्ती तर उपाधी आहे. संपत्ती जर ह्या बाजूला, धर्माच्या बाजूला वळली असेल तर त्यास हरकत