________________
पाप-पुण्य
असतच नाही. आमच्या घरी सुद्धा बिलकुल खरी नाही. पण या काळाच्या हिशोबानुसार असे चांगले विचार येतात की याला कशाप्रकारे सुख मिळेल, कशाप्रकारे त्याला ज्ञान प्राप्त होईल, धर्माचे विचार येतात, ही चांगली लक्ष्मी म्हटली जाते. पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी म्हटली जाते. पुण्यानुबंधी पुण्य म्हणजे पुण्य आहे आणि परत नवीन पुण्य बांधत आहे. विचार सगळे चांगले आहेत. जेव्हा दुसऱ्यांचे पुण्य तर असते पण विचार खराब असतात, म्हणजे काय भोगवू? कुठून घेऊन येऊ, पूर्ण दिवस हेच, रात्री पलंगावर झोपता झोपता सुद्धा मशीन चालवतच राहतो. रात्रभर.
आणि मग तिथे मुंबईमध्ये त्या लोकांकडे दर्शनासाठी मला बोलावतात, कारण की लोक जाणतात म्हणून दर्शनासाठी मला घरी घेऊन जातात. तिथे आम्ही जातो तेव्हा, तसा तर करोडो रुपयांचा मालक असतो, पण जसे एखाद्या मुडद्याला बसवले असते, तसा दिसतो तो आम्हाला. ते जय-जय करतात ना, मी समजून जातो की हे बिचारे मुडदे आहेत, मग तिथे बघतो की कोण-कोण चांगले आहेत? तर तिथे त्यांचे नोकर दिसतात ना, अरे, शरीर मजबूत, लाल, लाल... मग तो स्वयंपाकी भेटतो, तो तर अगदी धष्टपुष्ट, जसा हापूस आंबाच बघून घ्या! तेव्हा मी समजून जायचो की हे शेठ लोक अधोगतीत जाणारे आहेत. त्याचे हे चिन्ह आज दिसत आहे.
बत्तीस पक्वानांचे जेवणाचे ताट असेल, पण तो खाऊ शकत नाही, आम्ही सगळे सोबत जेवतो, परंतु शेठला आम्ही विचारले, तुम्ही खात का नाही? तेव्हा म्हणतो, मला डायबीटीज आहे आणि ब्लडप्रेशर आहे. __डॉक्टरांनी शेठला सांगितलेले असते की, 'बघा, तुम्हाला ब्लडप्रेशर आहे, डायबीटीज आहे, काही खायचे नाही. बाजरीची भाकरी आणि दही खायचे हं, दुसरे काही खायचे नाही?' अरे भाऊ, आमच्या इथे आम्ही बैलाला शेतात घेऊन जातो, तिथे बैल खात का नाही? शेतात आहे तरीही? तेव्हा म्हणतात मुश्क बांधलेले आहे. इथे तोंडाला बांधतात ना काही? काय म्हणतात त्याला?
प्रश्नकर्ता : जाळी.