________________
पाप-पुण्य
भगवंत काय म्हणतात की, तुला जे फळ चाखायला आवडते, त्याचेच बी पेर. सुख आवडत असेल तर पुण्याचे आणि दुःख आवडत असेल तर पापाचे बी पेर. परंतु दोन्ही रिलेटिव धर्म आहेत. रिअल नाही.
रिअल धर्मात, आत्मधर्मात तर पुण्य आणि पाप दोन्ही पासून मुक्ती पाहिजे. रिलेटिव धर्माने भौतिक सुखं मिळतात आणि मोक्षमार्गाकडे प्रयाण होते, जेव्हा की रिअल धर्माने मोक्ष मिळतो. इथे 'आमच्या' जवळ रिअल धर्म आहे, त्याच्याने सरळ मोक्षच मिळतो. इथेच मोक्ष सुख अनुभवता येते. इथेच आधी, व्याधी, उपाधी (बाह्य दुःख-बाहेरून येऊन पडणारे दु:ख) पासून मुक्ती मिळते आणि निरंतर समाधी रहाते. निराकुळता उत्पन्न होते, इथे तर आत्मा आणि परमात्म्याच्या गोष्टी होतात.
परमाणु फलीभूत स्वयं सुख-दुःखात प्रश्नकर्ता : पाप आणि पुण्याचे विभाग कोणी केले? दादाश्री : कोणीच केले नाही.
प्रश्नकर्ता : हे पाप आहे, हे पुण्य आहे हे सर्व बुद्धी सांगते, आत्म्याला तर पाप-पुण्य असे काहीच नसते ना?
दादाश्री : नाही, आत्म्याला नसते. समोरच्याला दुःख होईल अशी वाणी आम्ही बोललो ना, तेव्हा ती वाणीच स्वतः परमाणूंना खेचते. त्या परमाणूंना दु:खाचा रंग लागतो, नंतर ते परमाणु जेव्हा फळ देतात, तेव्हा ते दु:खच देतात, याच्यात इतर कोणाचीही ढवळाढवळ नाहीच.
यात जबाबदारी कोणाची? । प्रश्नकर्ता : एका व्यक्तीजवळ पैसा आणि एका व्यक्तीजवळ गरिबी, हे कशा प्रकारे येते? मनुष्यातच सगळ्यांनी जन्म घेतला आहे. तरीही?
दादाश्री : हे असे आहे, आपला हा जो जन्म होतो ना, तो इफेक्ट असतो, इफेक्ट अर्थात मागील जन्मी जे कॉझीझ टाकले होते, त्याचे हे फळ आहे. म्हणजे जितके पुण्य असते, त्या पुण्यात काय काय असते? तेव्हा