________________
२०
कर्माचे विज्ञान
करतो, अहंकार करतो, तेव्हा त्याचे फळ इथल्या इथेच भोगावे लागते. मान केल्याचे फळ इथल्या इथे कसे येते की, अपकिर्ती पसरते, अपयश येते, ते इथेच भोगावे लागते. मान करत असताना जर मनात असे वाटत असेल की, हे चुकीचे घडते आहे, असे होऊ नये. आपल्याला मान विलय करायची गरज आहे, असे भाव येत असतील तर ते नवीन कर्म बांधतो आहे. त्यामुळे पुढील जन्मात मग मान कमी होतो.
कर्माची थियरी अशी आहे. चुकीचे करत असताना जर आतील भाव बदलले गेले तर नवीन कर्म नवीन भावाप्रमाणे बांधले जाते. पण जर चुकीचे करून उलट वरून आत खुश होत असेल की, 'असे करण्यासारखेच आहे' तर मग नवीन कर्म मजबूत होते, निकाचित होते. ते मग भोगल्या नंतरच सुटका!
संपूर्ण सायन्सच समजून घेण्यासारखे आहे. वीतरागांचे विज्ञान खूप गुह्य आहे.
...की ह्या जन्माचे पुढील जन्मात? प्रश्नकर्ता : तर काय ह्या जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात मिळू शकते?
दादाश्री : हो, ह्या जन्मात मिळत नाही.
प्रश्नकर्ता : तर आता ह्या जन्मात आम्ही जे भोगत आहोत ते मागील जन्माचे फळ आहे का?
दादाश्री : होय, ते मागील जन्माचे आहे आणि त्याच्या सोबत नवे कर्म पुढील जन्मासाठी बांधले जात आहे. म्हणून तुम्ही नवे कर्म चांगले करायला हवे. हे तर आता बिघडलेले आहे पण पुढील बिघडू नये त्यासाठी जागृत रहायला हवे.
प्रश्नकर्ता : आता कलियुग चालू आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे सध्याचा मनुष्य चांगले कर्म तर करू शकत नाही.
दादाश्री : चांगल्या कर्मांची गरज नाही.