________________
भावना सुधारे जन्मोजन्म
वेळी तुम्ही दुसऱ्या जागी गुंतलेले नाही असायला पाहिजे. आम्ही एक क्षण देखिल दूसऱ्या जागी जात नाही. त्या मार्गावर तुम्हाला यावे लागेल ना? ज्या जागेवर आम्ही आहोत तिथेच ! ही भावना भावली म्हणजे पूर्ण होऊ लागतो. भावना तर एवढीच करण्या सारखी आहे.
हो, मन-वचन-कायाच्या एकतेने बोलाल ती भावना. म्हणून आता ही नव कलमे तर तुम्ही अचूक करायची. खास करा हे. संपूर्ण वीतराग विज्ञानाचा सार आहे ही नव कलमे ! आणि प्रतिक्रमण-प्रत्याख्यान सर्व ह्यात येऊन गेले. ही अशी नव कलमे निघाली नाही कोणत्या ही जागी. जसे हे ब्रह्मचर्य चे पुस्तक निघाले नाही, तसे ही नव कलमे ही नाही निघाली. नव कलमे जर वाचली ना, ही भावना भावली ना तर दुनियेत कोणा बरोबर ही वैर नाही राहणार, सर्वां बरोबर मैत्री होऊन जाईल. ही नव कलमे तर सर्व शास्त्रांचे सार आहे.
जय सच्चिदानंद