________________
भावना सुधारे जन्मोजन्म
३७
कशासाठी हे मी बोललो असेल की शक्ति मागा, शक्ति द्या असे? स्वताः डिझाईन करु शकत नाही. मुळ डिझाईन कशा रीतीने करु शकणार?! अर्थात् ही ईफेक्ट आहे(मागील कारणांचे परिणाम आज आले आहे.) ही जी शक्ति मागत आहोत ते कॉझ(कारण) आहे आणि नंतर येईल ते ईफेक्ट. (परिणाम.) ती ईफेक्ट पण कोणा मार्फत येते? दादा भगवानच्या मार्फत योजीले आहे. ईफेक्ट भगवानच्या श्रू(मार्फत) यायला पाहिजे.
म्हणून नव कलमां प्रमाणे शक्ति मागतच राहिले तर आपणहून च नव कलमां मध्ये राहणार मग. खूप वर्षा नंतर.
जग संबंधातून सूटण्यासाठी.... प्रश्नकर्ता : ही जी नव कलमे दिली आहेत ती विचार, वाणी आणि वर्तन यांच्या शुद्धते साठी दिली आहेत ना?
__दादाश्री : नाही, नाही. ह्यात त्याची गरजच नाही. अक्रम मार्गात ती गरजच नाही. ही नव कलमे तर अनंत अवतारांचा सगळ्यां बरोबर तुमचा जो सर्व हिशोब बांधलेला आहे तो सुटून जाण्यासाठी दिली आहे. वहीखाते चोख करण्यासाठी दिली आहेत.
___ म्हणून ही नव कलमे आहेत ते बोलाल तर बांधलेले तार सुटून जातील. लोकांच्या बरोबर ज्या ऋणानुबंधच्या तारी बांधलेल्या आहे ते तुमचा मोक्ष होऊ देत नाही. तर हे ऋणानुबंधचे तार सुटण्यासाठी ही नव कलमे आहेत.
__हे बोललात म्हणजे तुमची आता पर्यंतची जे दोषं होऊन गेलीत ते सगळे ढीले होऊन जातील बोलल्याने, आणि मग त्याचे फळ तर येणारच. सर्व दोष जळालेल्या दोरी सारखे होऊन जातात, ते असा हात लावल्या बरोबरच गळून पडतील.
प्रश्नकर्ता : दोषांचे प्रतिक्रमण करण्यासाठी आम्ही नव कलमे रोज बोलत राहिलो तर त्यात शक्ति खरी का?
.