________________
भावना सुधारे जन्मोजन्म
प्रसंग असेल तो सुद्धा जात राहणार, कारण हे संयोग प्राप्त झालेले आहेत. आणि ही भावना भाववायची आहे. त्याचा संयोग जमायचा अजून बाकी आहे (पुढच्या जन्मात).
३३
प्रश्नकर्ता : पण त्या प्रसंगामुळे जे स्वता:चे भाव बदलतात, तेंव्हा ही भावना वापरुन पुन्हा भाव फिरवायचा ना?
दादाश्री : पण ते काही हेल्प नाही करत. पूर्वी जेवढे केलेले असेल, ते आता हेल्प करेल. होय, असे बनेल की थोडे पूर्वी केलेले असेल तरच मग ह्या भवामध्ये सर्व काही परिवर्तन होईल.
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रसंगात तर मागच्या जन्मात जसे भाव असतील तसेच परिमाम येईल ?
दादाश्री : तसेच परिणाम येणार. दुसरे नाही येणार. भाव म्हणजे बी आणि द्रव्य म्हणजे परिणाम, कणीस. एक बाजरीचा दाणा टाकला, तर एवढे मोठे कणीस होईल.
ही कलमे तर फक्त बोलायचीच आहेत. रोज भावनाच भावायची आहे. हे तर बी रोपायचे आहे. रोपल्यानंतर मग जेव्हा फळ येईल तेव्हा पाहून घ्यायचे. तो पर्यंत खत घालायचे. बाकी ह्या प्रसंगात तर असे काही फिरवायचे नाही. आणि हे जे आहे ते जुने आहे तेच आहे.
म्हणजे हे नव कलमे काय म्हणतात ? ' हे दादा भगवान मला शक्ति द्या.' तेव्हा लोक काय म्हणतात ? ' हे तर पाळता येईल असे नाही आहे. ' अरे, पण हे करायचे नाही. मग कशासाठी वेडेपणा करतोस ! या जगात सगळेच सांगतात की 'करा करा करा. ' अरे करायचे नसतेच, जाणायचेच असते. आणि मग, 'मला असे नाही करायचे आणि त्याचा मी पश्चाताप करत आहे.' असे ‘दादा भगवान' जवळ माफी मागायची. आता 'असे नाही करायचे' असे बोलले तेथूनच आपला अभिप्राय वेगळा होऊन गेला. मग