________________
भावना सुधारे जन्मोजन्म
कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचित्मात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. हे समजवा.
दादाश्री : अहम् नाही दुभावणार(दुखावणार) त्या साठी आपण स्याद्वाद वाणी मागत आहोत. तशी वाणी आपल्यात हळूहळू उत्पन्न होईल. मी ही जी वाणी बोलतो न ते मला भावना भावण्याचे फळ मिळाले आहे.
प्रश्नकर्ता : पण ह्यात कोणाचा अहम् नाही दुभावला पाहिजे, तर ह्याचा अर्थ असा तर नाही होत न की कोणाचा अहम् पोषावा?
दादाश्री : नाही तसा अहम् पोषावयाचा नाही. हे तर अहम् दुभावायचे नाही असे पाहिजे. मी म्हणेन की काचेचे प्याले फोडू नका. ह्याचा अर्थ असा नाही की काचेचे प्याले सांभाळा. ते आपणहूनच सांभाळलेले आहेत म्हणून फोडू नका. तसे ते तर सांभाळलेल्या स्थितीतच पडले आहेत. तुम्ही तुमच्या निमित्ताने नका फोडू. ते तुटत असतील तर तुमच्या निमित्ताने नका फोडू. आणि ती तुम्हाला भावना भावण्याची आहे की मला कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख नाही होणार, त्याचा अहंकार भग्न नाही होणार असे ठेवले पाहिजे. त्याला उपकारी मानत आहोत.
प्रश्नकर्ता : धंद्यात समोरच्याचा अहम् दुभावणार नाही असे नेहमी नाही होत. कोणाचा न कोणाचा अहम् दुभावलाच जातो.
दादाश्री : त्याला अहम् दुभावला नाही म्हणत. अहम् दुभावला म्हणजे काय की तो बिचारा काही बोलावयास गेला नी आपण म्हणालो 'बस, बस नाही बोलायचे.' असे त्याच्या अहंकारला दुभावले नाही पाहिजे. आणि धंद्यात तर अहम् दुभावला तो वास्तविक अहम् नाही दुभावत, ते तर मन दुभावते.
प्रश्नकर्ता : पण अहम् ही काय चांगली वस्तु नाही, बरोबर? तर मग त्याला दुभावण्यात काय हरकत आहे?