________________
प्रसंग चोविसावा : ३१३
तदा स्वकीय निजांगणि । बहुतक दिवसापासुनि । शुष्क काष्ठ होते एक्या स्थानि । देवोनि सिरानि नीजला ॥८६॥ गुरुवाक्य धरोनि अंतरि । नौकारमंत्र स्मरण करि ।
दिवसाचे श्रम होते थोरि । म्हनोनि लौकर झाला निद्रिस्त || ८७ || अहो त्या जीर्ण काष्ठात । कृष्ण सर्प होता राहात | मध्यरात्रि निघोनि त्वरित । त्या ढीवरात डंकिला ॥८८॥
सर्प डंकिला जानुन । करू लागला मंत्रचिंतन |
तत्क्षणि पावला मरण । कोनाकारण न सोडि काल ॥ ८९ ॥ रोगि महादरीद्र । धनाढ्य आनि स्वरूपि थोरि । ज्ञानी योगी ब्रह्मचारि । न परिहरि काल कवना ||१०|| उक्तं च- न प्रहरति मृत्यु पंडितं श्रोत्रियं वा । धनकनकसमृद्धि बाहुवीर्यं रूपं वा । तपस्विनि यमयुक्तं सुस्थितं दुःस्थितं वा । वनगत इव वह्नि सर्वभक्षी कृतान्तः ॥ ९१ ॥ तदा ते घंटिका नारी । दया आनोनि हृदयांतरि । तत्समीप जावोनि सत्वरि । मिष्ट वैखरि वदतसे" ॥९२॥ स्वामी मी तव असे दासी । अज्ञानेकरोनि तुजसि । क्रोधाक्त बोलिलि भलतिसी । ते त्वा मानसि न आनिजे ॥९३॥ स्त्रिया म्हणजे मूर्खजाती । करू नये तेचि करिति । बोलू नये तेचि बोलति । न भेति पाप करावया कदा ॥ ९४ ॥ स्वामी आता उठावे लौकरि । कृपा करोनि मजवरि । महद् अपराध साटोपी उदरि । चालावे गृहांतरि स्वामिया ||१५|
२१. वचन.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org