________________ एकूण प्रबंधसंख्या 24 आहे. हरिहरकवि, अमरचन्द्र, मदनकीर्ति, रत्नश्रावक व आभडश्रावक यांवरील प्रबंध पूर्वीच्या प्रबंधांहून वेगळे आहेत. आपल्या या चर्चासत्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे विविधतीर्थकल्प' हा होय. 14 व्या शतकातच जिनप्रभसूरींनी हा ग्रंथ लिहिला. ग्रंथातील प्रत्येक निबंधाला 'कल्प' म्हटले आहे. एकूण 62 कल्प आहेत. यातील पहिला शत्रुञ्जयतीर्थकल्प संस्कृतात आहे. बाकीचे प्रायः 50 कल्प जैन महाराष्ट्री प्राकृतात आहेत. प्राकृत भाषा अतिशय रसाळ आहे. प्रस्तावनेतच मुनि जिनविजय म्हणतात की हे जणू काही भारतातील तीर्थक्षेत्रांचे गाइडबुक'च आहे. भारतात 11-12 व्या शतकापासून ते 16-17 व्या शतकापर्यंत मुस्लीम राजवट कमी-अधिक प्रमाणात पसरलेली होती. 5 पातशाह्यांचा अंमल चालू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळात जैन आचार्यांनी मात्र संस्कृत, जैन महाराष्ट्री आणि अपभ्रंश या भाषांमध्ये विपुल ग्रंथसंपत्ती निर्माण केली. काही मुगल बादशहांच्यदरबारात त्यांचा प्रभाव लक्षणीय दिसतो. ___इतिहासात 'वेडा महम्मूद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महम्मद तुघलकाच्या दरबारात जिनप्रभसूरींना अतिशय मान होता. (गिरीश कर्नाड यांनी 'तुघलक' नाटकात या बादशहाच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.) आपल्या विरक्त, निःस्पृह आणि ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्वाने जिनप्रभसूरींनी या सम्राटाला प्रभावित केले होते. त्यांचे इतिहासाचे आणि तीर्थभ्रमणाचे प्रेम विविधतीर्थकल्पातून उत्तम रीतीने व्यक्त होते. गुजरातव काठेवाडमधील 8 तीर्थक्षेत्रे, युक्तप्रान्त आणि पंजाबमधील 6, राजपुताना व माळव्यातील 7, अवध व बिहारमधील 11, दक्षिण व बराड (व-हाड) मधील 3 आणि कर्णाटक व तेलंगणातील 3 तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करून यांनी त्यावर आधारित 'कल्प' लिहून मोलाची कामगिरी केली. (या ठिकाणी काश्मिरी कवी कल्हण याच्या राजतरङ्गिणी' ग्रंथाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. काश्मिरचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचे ते एकमेव साहित्यिक साधन आहे.) 16 व्या शतकात झालेल्या सम्राट अकबराच्या दरबारात ज्या प्रतिभावंतांना मानाचे स्थान होते त्यात जैन आचार्य हीरविजयसूरि यांचा गौरवाने उल्लेख करता येईल. येथे आयोजित केलेल्या चर्चासत्राशी सुसंगत अशा तीन कल्पांचा आपण या चारही ग्रंथांच्या आधारे आढावा घेऊ. 'नासिक्यपुरकल्प हा 28 वा कल्प संपूर्णतः प्राकृतात आहे. तो आठवे तीर्थंकर चन्द्रप्रभ यांच्या संदर्भात आहे. 'नासिअकलिमलनिवह' (नाशित-कलि-मल-निवह) असा नाशिक नावावर श्लेष केलेला आहे. ब्राह्मणादि तीर्थिक याविषयी काय माहिती सांगतात ते आरंभी दिले आहे. कृतयुगात ब्रह्मदेवाचे कमळ अरुणा-वरुणा-गंगा यांनी भूषित अशा महाराष्ट्रात पडले. तेथे ब्रह्मदेवाने पद्मपुर वसविले. यज्ञात देव आले. दानव येईनात. ते म्हणाले, जर चंद्रप्रभस्वामी आले तरच आम्ही येऊ. ब्रह्मदेवाने विहार करणाऱ्या चंद्रप्रभस्वामींचा शोध घेऊन येण्याची विनंती केली. चंद्रप्रभ म्हणाले, 'माझ्या प्रतिरूपाने म्हणजेच मूर्तीनेही काम होईल'. चंद्रकांत रत्नांपासून बनविलेली प्रतिमा ब्रह्मदेवाने सौधर्म इंद्राकडून घेतली. नाशिकक्षेत्र हे कृतयुगातले पद्मपुर' होय. त्रेतायुगात राम, लक्ष्मण, सीता पितृआज्ञेने वनवास पत्करून गौतमीगंगा'तीरावरील पंचवटीत राहिले. गौतमी म्हणजे प्राकृतात गोदमी - त्यावरून 'गोदावरी' नाव पडले असावे. शूर्पणखेचे 'नाक' रामाने छेदले म्हणून नासिक्क' नाव पडले. रामायण घडले. अयोध्येस परत जाताना, येथे थांबून रामाने चंद्रप्रभमंदिराचा उद्धार केला. कालांतराने पुण्यभूमी म्हणून जनकराजा येथे आला. त्याने यज्ञ केला. 'जनकस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आजही नाशिकजवळचा आदिवासी भाग 'जनस्थान' म्हणून प्रसिद्ध आहे. कवी कुसुमाग्रजांनी तेथे बरेच कार्य केले हे आपल्याला माहीत आहेच. शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचे दंडकराजाने अपहरण केले. शक्राचार्यांनी शाप दिला. दंडक राजा चंद्रप्रभस्वामींना शरण गेला. शापमुक्त झाला. या घटनेनंतर कवी लिहितो, 'परतीर्थिकही ज्याचा महिमा गातात त्या