________________ वर वर्णन केलेल्या ग्रंथांचा सामग्याने, एकत्रित विचार केला तर महावीरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम त्यातून प्रकट होतात. आचारांगातून शुद्ध तत्त्वचिंतक महावीर प्रकटतात. सूत्रकृतांगात ते विविध दार्शनिक विचप्रवाहांच्या खंडनमंडनात मग्न दिसतात. स्थानांग-समवायांगात त्यांची कोशविषयक प्रतिभा प्रकट होते. व्याख्याप्रज्ञप्तीतून ते अनेक समकालीन ऐतिहासिक तथ्यांवर प्रकाश टाकतात. ज्ञातासूत्रातून त्यांच्या कथा व दृष्टान्तरचनेचे कौशल्य फ्रट होते. उपासकदशेत ते गृहस्थोपयोगी धार्मिक आचार सांगतात. विपाकश्रुत ग्रंथातून ते कर्मसिद्धान्ताचे व्यावहरिक परिणाम दर्शवितात तर 'उत्तराध्ययनसूत्र' त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा कळसाध्याय आहे. जैन परंपरा अवतारवादावर विश्वास ठेवत नाही. भ. महावीर काही पुन्हा अवतरणार नाहीत पण महावीरवाणीतून आपण आपापल्या कुवतीनुसार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुन:पुन: वेध मात्र घेऊ शकतो. **********