SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 23
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ 10 वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी म्हणून तुम्ही आता अरिहंत कोणाला मानायचे? तर सीमंधर स्वामींना आणि जे इतर एकोणीस तीर्थंकर आहेत. ते सर्व अरिहंतच आहेत, पण त्या सर्व तीर्थंकरांसोबत संबंध ठेवण्याची काही आवश्यकता नाही. एकाची आराधना केल्याने सर्वच येऊन जातात. अर्थात सीमंधर स्वामींचे दर्शन करा. 'हे अरिहंत भगवंत! तुम्हीच खरे अरिहंत आहात आता!' असे बोलून नमस्कार करावा. तिथे आहे मन-वचन-कायेची एकता महाविदेह क्षेत्रात सुद्धा माणसं आहेत. ते आपल्यासारखेच आहेत, देहधारीच आहेत. तेथील माणसांचेही जिव्हाळे आपल्या सारखेच आहे. प्रश्नकर्ता : तिथे तर खूप आयुष्य असते ना दादाजी? दादाश्री : हो, जास्त आयुष्य असते, खूपच आयुष्य असते. बाकी, आपल्यासारखीच माणसं आहेत, आपल्या सारखाच व्यवहार आहे. पण ते आपल्या इथे चौथा आयत जसा व्यवहार होता तसा व्यवहार आहे. या पाचव्या आऱ्यातील लोक तर आता खिसे कापायला शिकले आणि आतल्याआत नातेवाईकांची निंदा करण्याचेही शिकले. महाविदेह क्षेत्रात असा व्यवहार नाही. प्रश्नकर्ता : तिथे सुद्धा अशाच प्रकारचा सर्व संसार आहे का? दादाश्री : हो, असेच सर्व. ती सुद्धा कर्मभूमी आहे. तेथील लोकांनाही 'मी करतो' असे (चुकीचे) भान असते. त्यांच्यातही अहंकार, क्रोध-मान-माया-लोभ असतो. तिथे आता तीर्थंकर हजर आहेत आणि आपल्या येथे चौथ्या आयत तीर्थंकर असतात. बाकी दसऱ्या सर्व गोष्टी आपल्यासारख्याच असतात. चौथ्या आणि पाचव्या आयात फरक काय? तेव्हा म्हणे, चौथ्या आऱ्यात मन-वचन-कायेची एकता असते आणि पाचव्या आयात ही एकता तुटून गेलेली असते. अर्थात जसे मनात असते, तसे वाणीत नसते आणि जसे वाणीत असते तसे वर्तनात आणत नाही,
SR No.034050
Book TitleThe Current Living Tirthankara Shree Simandhar Swami
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages50
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy