________________
दान
घेत आहोत. सगळ्यांनाच काय अक्कल नाही? तेव्हा म्हणे, 'अक्लीने नाही दिले, वरुनच आहे ! तुम्ही बँकेत ओवरड्राफ्ट क्रेडीट केले असेल तर तुमच्या हातात चेक येईल.' अर्थात् बुद्धि चांगली असेल ना तर पुन्हा जोईन्ट होऊन जाते सर्व.
घेतांना पण किती बारीक समज इथे फक्त जी पुस्तके छापली जातात तीच आणि इतका विश्वास नक्कीच आहे की या पुस्तकांचे पैसे येऊन मिळतील, आपल्या आपणच. त्याच्या मागे निमित्त आहे. ते सगळे येऊन मिळतील. त्यांना काही सांगावे लागत नाही किंवा भिक मागावी लागत नाही. कोणाकडून मागाल तर त्याला दु:ख होईल. तो म्हणेल इतके सारे ? 'इतके सारे' म्हटल्या बरोबरच त्याला दुःख होते. अशी आपल्याला खात्री झाली ना? आणि कोणालाही दुःख झाले म्हणजे आमचा धर्म राहिला नाही. म्हणून आपण कधीही मागु नये. तो स्वत:च्या खुशीने म्हणत असेल तर आपण घेऊ शकतो. तो स्वतः ज्ञानदानाचे महत्व समजत असेल तरच आपण घेऊ शकतो. ज्यांनी ज्यांनी दिले आहेत ना, ते स्वतः ज्ञानदान समजून देतात. आपल्या आपणच देतात. आतापर्यंत मागितले नाही.
येथे पुस्तक छापून घेतले असेल तर आमच्या पैशांची शोभा येईल आणि पुण्य असेल तेव्हाच तसा मेळ बसतो. पैसे चांगले असतील तरच छापून घेता येईल. नाहीतर छापली जात नाही, तसा मेळ बसतच नाही ना!
स्पर्धा नाही होत येथे आणि स्पर्धेत ते बोलण्याची गरज नाही. हे स्पर्धेच्या लाईनीतले नाही की येथे बोली लावली जाईल की हा इतके बोलला, तो तितके बोलला! वीतराग्यांकडे अशी स्पर्धा होत नाही. पण हे तर दुषमकाळात घुसले आहे असे सर्व, ही दुषम काळाची लक्षणे सगळी. स्पर्धा करणे, हा तर भयंकर रोग आहे. मनुष्य पैज लावतो. आपल्या इथे असे कोणतेच लक्षण नसते. येथे पैशांची मागणी केली जात नाही.