________________
दान
दादाश्री : हो, जे करायचे असेल ते करा. आपल्या हातुनच केले पाहिजे! आपला मार्ग काय म्हणतो की जो तुझा स्वत:चा माल आहे, त्याला तु वेगळा करुन खर्च कर, तर तो तुझ्यासोबत येईल. कारण बाहेरगावी जातो तेव्हा थोडी शिदोरी घेऊन जातो, मग हे सगळे नको का?
प्रश्नकर्ता : जास्त तर केव्हा म्हणावे? ट्रस्टी प्रमाणे राहिले तर.
दादाश्री : ट्रस्टी प्रमाणे राहणे उत्तम आहे. पण असे राहता येत नाही, सगळे असे राहू शकत नाही. ते सुद्धा पूर्णपणे ट्रस्टी प्रमाणे राहू शकत नाही. ट्रस्टी अर्थात् तर ज्ञाता-दृष्टा झाले. पण ट्रस्टी प्रमाणे पूर्णपणे राहिले जात नाही. पण जर असा भाव असेल तर थोडे-फार राहू शकतो.
आणि मुलांना तर किती द्यायचे असते? आपल्या वडीलांनी आपल्याला दिले असेल तेवढे, काही दिले नसेल तरी आपण काही न काही दिले पाहिजे.
मुले दारुडे बनतात का, फार वैभव असेल तर?
प्रश्नकर्ता : हो बनतात. मुले दारुडे बनणार नाहीत तेवढे तर दिले पाहिजे?
दादाश्री : तेवढेच दिले पाहिजे. प्रश्नकर्ता : जास्त वैभव दिले तर तसे होऊ शकते.
दादाश्री : हो, ते नेहमीच त्याचा मोक्ष बिघडवेल. नेहमी पद्धतशिर असलेलेच चांगले. मुलांना जास्त देणे हा गुन्हा आहे. हे तर फोरनवाले सर्व समजतात! किती समंजस आहेत!! आणि यांना तर सात पीढ्यांपर्यंतचा लोभ! माझ्या सातव्या पीढीच्या माझ्या मुलाकडे असे असावे. किती लोभी आहेत हे लोक? मुलांना आपण काम धंद्यावर चढवायचे, तितके आपले कर्तव्य आणि मुलींचे तर आम्ही लग्न करुन दिले पाहिजे. मुलींना काहीतरी दिले पाहिजे. आजकल मुलींचा वाटा द्यायला लावतात ना वाटेकरी