________________
दान
45
लक्ष्मी दिली आणि पाटी घेतली प्रश्नकर्ता : कित्येक लोक समजल्याशिवाय दान देतात, तर त्याचा काही अर्थच नाही?
दादाश्री : नाही, समजल्याशिवाय देत नाहीत. ते तर फार पक्के, ते तर स्वत:च्या हिताचेच करतात.
प्रश्नकर्ता : धर्माला न समजता, नावासाठीच देतात. पाटी लावण्यासाठीच देतात.
दादाश्री : हे नाव तर, हल्ली ह्या नावाचे चालले आहे, पूर्वी नावाचे नव्हते. हे तर आता विकायला लागले नाव, ते या कलियुगामुळे. बाकी पूर्वी नाव-बिव नव्हतेच. ते देतच असत निरंतर. म्हणून देव त्यांना काय म्हणत? श्रेष्ठी म्हणत, आणि आता ते शेठ म्हटले जातात.
शुभ भाव करत राहा प्रश्नकर्ता : एकीकडे तर मनात भाव होतो की मला दानमध्ये सर्वकाही देऊन टाकायचे आहे, पण रुपकात तेही होत नाही.
दादाश्री : ते दिले जात नाही ना! देणे काही सोपे आहे? दान करणे ही तर कठीण वस्तू आहे! तरी पण भाव केला पाहिजे. धन चांगल्या मार्गाने देणे ते आमच्या सत्तेत नाही. भावना करु शकतो, पण देऊ शकत नाही आणि त्या केलेल्या भावनेचे फळ पुढच्या जन्मी मिळते. दान तर हे भोवरे (मनुष्य) कसे देणार? अणि जे देतात ते तर 'व्यवस्थित शक्ति' त्यांना देण्यास भाग पाडते, म्हणून देतात. 'व्यवस्थित शक्ति' करवते, म्हणून मनुष्य दान देतो. आणि 'व्यवस्थित शक्ति' नाही करवत, म्हणून मनुष्य दान देत नाही. 'वीतरागांना' दान देण्याचा किंवा घेण्याचा मोह नसतो. ते तर शुद्ध उपयोगी असतात.
दान देतांना 'मी दान देतो' असा भाव होतो. त्यावेळी पुण्याचे