________________
दान
असेच सचोटीने बांधत असत, सात-सात पिढ्यापर्यंत गरिबी जात नव्हती. अत्यंत दु:ख भोगत. अर्थात् एक्सेस (अति) पण होत असे आणि मिडीयम (मध्यम) पण राहत असे.
इथे अमेरिकेत तर उतू पण जाते आणि परत बसतेही. एकदा बसल्यावर पुन्हा उतूही जाते. इथे वेळच लागत नाही. आणि तिथे भारतात एकदा बसल्यावर पुन्हा उतू जाण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणूनच तेथे तर सात-सात पिढ्यांपर्यंत चालत असे. आता सगळे पुण्य कमी झाले आहे. कारण काय होते, की कस्तूर भाऊच्या येथे जन्म कोण घेणार? तेव्हा म्हणा असेच पुण्यवान, की जे त्यांच्या सारखेच असतील, तेच तेथे जन्म घेतील? मग त्यांच्या घरी कोण जन्माला येतो? तर तसाच पुण्यशाली तेथे जन्माला येतो. यात कस्तूरभाईचे पुण्य काम करत नाही. ते मग तसाच कोणी दुसरा आला असेल त्याचे पुण्य. म्हणून तर ती म्हटली जाते कस्तूरभाईची पिढी, आणि सध्या तर असे पुण्यशाली आहेतच कुठे? आता गेल्या पंचवीस वर्षात तर खास असे कोणी नाहीच.
नाहीतर गटारात वाहून जाईल... ___पूर्वी तर लक्ष्मी पाच पिढ्यांपर्यंत तरी टिकायची, तीन पिढ्यांपर्यंत तरी टिकायची. आता तर लक्ष्मी एक पिढी सुद्धा टिकत नाही. या काळाची लक्ष्मी कशी आहे? तर एक पिढी सुद्धा टिकत नाही. त्यांच्या उपस्थितीतच येते आणि त्यांच्या उपस्थितीतच जाते, अशी ही लक्ष्मी आहे. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. त्यात जर थोडी-फार पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असेल, तर ती तुम्हाला येथे (सत्संगात) येण्यासाठी प्रेरणा देते. इथे तुमची भेट घालून देते आणि इथे तुमच्याकडून खर्चही करवते. चांगल्या मार्गाने लक्ष्मी जावी, नाहीतर सर्व धुळीत मिळून जाईल. सर्व गटारात वाहून जाईल... ही मुले आपलीच लक्ष्मी उपभोगतात ना. आणि आपण जर मुलांना म्हटले की तुम्ही आमची लक्ष्मी उपभोगता, तर ते म्हणतील तुमची कशी? 'आम्ही तर आमचीच भोगतोय,' असे बोलतील. म्हणजे गटारीतच गेले ना सगळे!