SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 386
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३६. शीत उष्ण भन्नांचे गुण. अत्युष्णानं बलं हन्यादतिशीतं तु दुर्जरम् ।। तस्मात्कवोष्णं भुञ्जीत विषमासनवर्जितः ॥ १८२ ।। __ अर्थ- अतिशय उष्ण अन्न भक्षण केले असतां तें बलाचा नाश करते.. अतिशय थंड अन्न भक्षण केले ६ असतां तें पचत नाही. ह्मणून अन्न किंचित् उष्ण असावें. आणि भोजन करतांना अवघडून बसू नये. भोजन व जलपान ह्याविषयी विशेष नियम. तृषितस्तु न भुञ्जीत क्षुधितो न पिवेज्जलम् ॥ तृषितस्तु भवेगुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ।। १८३ ॥ अर्थ- तहान लागल्या वेळी अन्न खाऊ नये. आणि भूक लागल्या वेळी पाणी पिऊ नये. कारण, जर तृषित मनुष्याने पाणी प्यावयाचे सोडून भोजन केले तर त्याला गुल्म नांवाचा रोग होतो [पोटांत गांठ होते.] आणि क्षुधित मनुष्याने अन्न भक्षण न करतां जर क्षुधेच्या शांतीकरितां नुसते जलप्राशन केले, तर त्याला जलोदर होतें. अन्नभक्षणाचा क्रम. आदौ स्वादु स्निग्धं गुरु मध्ये लवणमाम्लमुपसेव्यम् ॥ veeneed ८८ . Veeeeeee: For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy